घरमुंबईशब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिली का? - अरविंद सावंत

शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिली का? – अरविंद सावंत

Subscribe

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे उत्तर

ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित करत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिच का? असा प्रश्न सध्या पडत असल्याची टीका राजनाथ सिंह यांनी केल्यानंतर आता त्यांच्या या टिकेला शिवसेनेकडून जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. इतकेच नाही तर तुम्ही राजकारणात व्यापार मांडलाय. तो पहा मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर कर्नाटकात तुम्ही काय केले. तुम्ही अंतर्मुख झाले पाहिजे असा सल्लाच अरविंद सांवत यांनी भाजपला दिला.

तसेच आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की हा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आहे का? शिवसेना आणि सत्ता असे काही नाही. सत्ता हे आमचे साधन आहे साध्य नाही. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तशीच आहे. त्याच विचारांनी काम करत असल्याचे सावंत यावेळी म्हणालेत. तसेच राजनाथसिंग आम्हाला सर्वांना आदरणीय आहेत. त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण मुळात ते शिवसेनेवर बोलतात तेव्हा दुःख होते. तेव्हा स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे. शिवसेनेने आयुष्यात कुणाला धोका दिला नाही. शिवसेनेला अनेक लोकांनी धोका दिला आहे. शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये असे देखील अरविंद सावंत यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधीत करताना राजनाथ सिंह यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. भाजप धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचे चारित्र्य असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याची टीका देखील त्यांनी केली होती.


जागतिक आरोग्य संघटनेचे वाभाडे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -