घरमुंबईThackeray On Rane : कोंबडी चोर, लायकी, डबडी अन बरंच काही; राणेंच्या...

Thackeray On Rane : कोंबडी चोर, लायकी, डबडी अन बरंच काही; राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली

Subscribe

कणकवलीत आयोजित सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकण किनारपट्टीवर मला भगवं वादळ दिसतेय, ते दिल्लीकडे निघालं आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात जे चाललंय ते योग्य नाही. गुंडांच्या लाचाराच्या देशा ही महाराष्ट्राची ओळख नाही.

कणकवली (सिंधुदुर्ग) : आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठोकर यांनी भाजपसह राणे पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला. मी त्यांच्यावर काय बोलणार, लायकीच नाही अशा शब्दांत त्यांनी मंत्री नारायण राणेंसह, आमदार नितेश राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांच्या या टीकेला राणेंकडून कसे उत्तर मिळते ते पहावे लागणार आहे. (Thackeray On Rane Chicken thief Laiki Baddi and many more Thackeray’s cannon exploded in Ranes fort)

कणकवलीत आयोजित सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकण किनारपट्टीवर मला भगवं वादळ दिसतेय, ते दिल्लीकडे निघालं आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात जे चाललंय ते योग्य नाही. गुंडांच्या लाचाराच्या देशा ही महाराष्ट्राची ओळख नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. हल्ली पंतप्रधांनाना महाराष्ट्रात यावं लागते. आता पुन्हा 19 फेब्रुवारीला येत आहेत. सिंधुदुर्गात आले पण महाराजांचं दर्शन घेतलं नाही. ते आले त्याचा आनंद आहे पण त्यांनी कोकणाला काही दिलं तर नाहीच, पण येथील पाणबुडी प्रकल्प घेऊन गेले. पण मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एकट्या गुजरातचे नाही. पण ते येथे येतात आणि काय चांगलं आहे ते पहतात आणि घेऊन जातायेत. आम्ही गुजरातबद्दल दुजाभाव करत नाही.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Congress : काँग्रेसचे 15 आमदार महायुतीत जाणार? मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता

आमचा गुजरातबद्दल द्वेष नाही. पण तुमची अशी भावना आहे की, गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल, पण माझा महाराष्ट्र समृद्ध आहे. हा वीरांचा महाराष्ट्र आहे. समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे. आम्ही कधीच गुजरात आणि महाराष्ट्र असा भेदभाव केला नाही. परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जर तिकडे गुजरातला नेत असाल आणि त्याला इथलं सरकार मदत करत असेल तर मग यांना गाढावचं लागले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा : Prajakta Mali : भल्या पहाटे पुणे ते मुंबई एसटीने प्रवास अन्…, प्राजक्ता माळीचा संघर्षमय प्रवास

पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोंबडी चोराबद्दल काय बोलणार, बोलायच्या लायकीचा नाही. या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा तिची आपण पूजा करतो, कारण ती पवित्र आहे. परंतु दुर्देवाने या मतदार संघामध्ये गटारगंगा असेल त्याला मी काय करू शकतो. गटारगंगा खूप घाणेरडी आहे.

काही दिवसापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका ठिकाणी म्हटले होते की, मला रोज दोन ते तीन किलो शिव्या खाव्या लागतात. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे तुमचे भोकं पडलेली टीनपाड, डबडी ते का आम्हाला रजगुल्ले देतात? परंतु मी माझ्या शिवसैनिकांना सांगितले की, त्यांच्यावर संस्कार नाहीत. ते बोलतील म्हणून त्यांना त्यांच्या भाषे उत्तर द्याचे नाहीत. पण यानंतर आता एक करायचं की, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील ते बोलल्यानंतर माझं नाव बाजुला ठेवायचं आणि बेधडक भाजपच्या नेत्याचं नाव टाका आणि हा त्याला बोलला आहे असं वाचायला लावा. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजेल की शिव्या काय असतात तर. असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -