घरमुंबईVijay Wadettiwar : गुंडांना संरक्षण देणारं आणि पोसणारं हे सरकार; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या'...

Vijay Wadettiwar : गुंडांना संरक्षण देणारं आणि पोसणारं हे सरकार; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ फोटोवर टीका

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा, खासदार श्रीकांत शिंदे आणि कुख्यात गुंड हेमंत दाभेकरसोबतचा फोटो ट्वीट केला होता. यानंतर आज, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारला आता कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. विधानसभा विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. (Vijay Wadettiwar A government that protects and feeds gangsters Criticism on that photo of Chief Minister Eknath Shinde)

हेही वाचा – Sanjay Raut On CM Shinde : मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुंड निलेश घायवळ: संजय राऊतांकडून फोटो ट्वीट

- Advertisement -

विजय वडेट्टीवार म्हणाले की, कायदा सुव्यवस्था हे विषय आता संपले आहेत. मुख्यमंत्र्यांना काल भेटायला गेलेला निलेश घायवळ हा गुंड मंत्रालयात रिल तयार करतो. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. जामीनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रिल तयार करतो आणि बाकीचे लोक लाइनमध्ये मरतात. लाइनमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश दिला जातो, ही या सरकारची खरी कमाई आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

गुंडांना संरक्षण देणारा आणि गुंडाना पोसणारं हे सरकार आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, असा आरोप करतानाच विजय वडेट्टीवर म्हणाले की, हे सर्व मूर्तिमंत उदाहरण आहे, असं मी मानतो. एक जामीनावर गंभीर गुन्हे असलेला आरोपी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची सहाव्या माळ्यावर भेट घेतो. त्यांचे सल्लागार त्यांना काय सल्ला देत आहेत? असाही प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Piyush Goyal : पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता; ‘या’ भाजपा आमदाराचा पत्ता होणार कट?

गुडांना भेटण्याची का गरज पडत आहे?

पण मुख्यमंत्री शिंदे कष्टातून आणि मेहनतीतून उभे झाले आहेत. मात्र पक्षफोडाफोडी केल्यानंतर त्यांच्या मागे संख्याबळ असतानाही त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुडांना भेटण्याची का गरज पडत आहे? याचा खुलासा महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे. पण पक्षफुटीनंतर होती नव्हीत ती महाष्ट्राच्या इज्जत चव्हाट्यावर आणली आहे. यानंतर आता उरली सुरलेली इज्जत गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांच्याकडून ट्विटरच्या माध्यमातूनही टीकास्त्र

दरम्यान, विजय वडेट्टीवर यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की, महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण-तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहेत. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. असे असताना इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहेत. हीच का ती “मोदी की गॅरंटी”? असा प्रश्नही विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -