घरताज्या घडामोडीशुक्रवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पाणीपुरवठा बंद!

शुक्रवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पाणीपुरवठा बंद!

Subscribe

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मार्फत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील फिडरवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवार २० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठी करून ठेवण्यासंदर्भात आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाणेकरांना शुक्रवारी काही भागांमध्ये पाणी समस्येचा सामना करावा लागू शकतो.

ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत( रूपादेवीपाडा, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं. २, वागळे फायर ब्रिगेड) माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत( कोलशेत गाव, बाळकूम), तसेच वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा इत्यादी भागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीतही पाणीपुरवठा बंद!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून २२ किलो वॅट फिडरच्या देखभाल दुरुस्तीची कामे यादरम्यान केली जाणार आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील काही भागासोबतच कल्याण-डोंबिवली परिसरात देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार दिनांक २०/११/२०२० रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडीत राहणार असल्याने महापालिकेतील नेतीवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -