घरमुंबईतरुणांमध्ये देशप्रेमाची जागृती होणे आवश्यक- कुलगुरू

तरुणांमध्ये देशप्रेमाची जागृती होणे आवश्यक- कुलगुरू

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त 'प्रणाम भारत कला अभियान' यांच्या वतीने तरुणांमध्ये "नेशन फर्स्ट" ची जाणीव निर्माण करणारा आणि भारतीय सैन्य दलाला मानवंदना देणारा "जागते रहो" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रणाम भारत कला अभियान’ यांच्या वतीने तरुणांमध्ये “नेशन फर्स्ट”ची जाणीव निर्माण करणारा आणि भारतीय सैन्य दलाला मानवंदना देणारा “जागते रहो” हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले की, आपले सैन्य आपल्या संरक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र कार्यरत असतात, या सैनिकाप्रती आणि देशाप्रती देशप्रेम आपल्या मनात सतत असणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांमध्ये देशप्रेमाची जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

सीमेवरील यथार्थ दर्शन 

यावेळी सैनिकासाठी कार्य करणाऱ्या लक्ष्य फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी भारतीय सैन्य जे सीमेवर कार्य करत आहेत. या सैन्यदलाचे प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे दर्शन छायाचित्र आणि चित्रफितीद्वारे त्यांनी तरुणांना दाखविले. आपले सैन्यदल काश्मीर, कारगिल, द्रास, सियाचीन, अरुणाचल प्रदेश अशा अनेक खडतर ठिकाणी सतत २४ तास डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा करण्याचे कार्य कसे करतात याचे यथार्थ दर्शन अनुराधा प्रभुदेसाई यांनी तरूणांना घडवले आहे.

- Advertisement -

“नेशन फर्स्ट” भावना निर्माण होणे आवश्यक

याठिकाणी वीरमाता अनुराधा गोरे उपस्थित होत्या. त्या बोलताना म्हणाल्या की, युद्धामध्ये तसेच युद्धानंतर लाखो सैनिक मृत्यू आणि जखमी झालेले आहेत. यातील जखमी सैनिक अनेक वेळेस अपंग होतात, परंतु ते स्वतःला अपंग मानत नाहीत. तसेच अनेक युद्धामध्ये मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांनाही मी भेटले त्यावेळी त्यांचे म्हणणे असे होते कि, आम्हाला सहानुभूती देण्यापेक्षा आम्हाला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या, सर्व भारताच्या सरहद्दीवर मी स्वतः जाऊन आले आहे. त्यावेळी सैनिक म्हणतात की, युद्धामध्ये माझा मृत्यू झाला तरी पुढील जन्म हा सैनिकाचाच मिळाला पाहिजे, अशी भावना सैनिकांमध्ये असते. मात्र, हिच भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आणि तरुणांमध्ये असली पाहिजे. तरुणांमध्ये देशाप्रती “नेशन फर्स्ट” ही भावना निर्माण करणे आवश्यक आहे.

उपस्थित मान्यवर

तसेच या कार्यक्रमामध्ये भारतीय सैन्य दलातील निवृत्त एअर मार्शल सुनील सोमण, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन आणि निवृत्त व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे यांनी सैन्यदल, वायुसेना आणि नौसेना मधील सैनिकांची सद्यस्थिती, त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी आणि मुंबई विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक मुकादम यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची संकल्पना पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर, अभिराम भडकमकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉ. अमोल देशमुख, कुणाल रेगे आणि अभिषेक मराठे यांची होती. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, सिने अभिनेत्री किशोरी शहाणे-विज ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे समन्वयक दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालिका डॉ. शेफाली पंड्या आणि प्रा. मंदार भानुशे हे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -