घरनवी मुंबईपोलिस निरिक्षक शिरीष पवार यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित; सामाजिक,राजकीय नेत्यांकडून अभिनंदन

पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित; सामाजिक,राजकीय नेत्यांकडून अभिनंदन

Subscribe

मुंबई,नवी मुंबईत अनेक सशस्त्र दरोडे,बलात्कार प्रकरणातील आरोपींना जेरबंद करीत जनमनात स्वत:ची विशेष प्रतिमा निर्माण करणारे आणि ‘शहर सुरक्षित तर नागरिक सुरक्षित’ असा ब्रिदवाक्यानुसार खोपोलीात कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

खोपोली: मुंबई,नवी मुंबईत अनेक सशस्त्र दरोडे,बलात्कार प्रकरणातील आरोपींना जेरबंद करीत जनमनात स्वत:ची विशेष प्रतिमा निर्माण करणारे आणि ‘शहर सुरक्षित तर नागरिक सुरक्षित’ असा ब्रिदवाक्यानुसार खोपोलीात कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या गौरवाबद्दल येथील पोलिस ठाणे आणि शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने पवार यांचे सामाजिक संघटना,राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून अभिनंदन केले जात असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पोलिस निरिक्षक पवार यांनी २६ वर्षापूर्वी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाले.त्यानंतर मुंबई टिळक नगर पोलिस स्टेशन,आर्थिक गुन्हे विशेष शाखा येथे कर्तव्य बजावून पदोन्नती होत नवी मुंबई येथे एपीएमसी पोलिस स्टेशन, वाशी वाहतूक शाखा, खंडणी विरोधी पथक,मोटार वाहन चोरी विरोधी पथक,रबाळे पोलिस ठाणे आादी पोलिस ठाण्यात काम केले आहे. खोपोलीत बदलीहून आल्यावर शहर सुरक्षित तर नागरिक सुरक्षित असा ब्रिदवाक्यानुसार खोपोली शहरात कायदा व सुव्यवस्था राखत आहेत.सायबर गुन्हयाबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये व्याख्याने,सामाजिक कार्यात सहभाग घेत असल्याने पोलिसांच्या कामगिरीसाठी दिला जाणार्‍या राष्ट्रपती पदकाने खोपोलीचे पोलिस निरिक्षक शिरीष पवारांना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.

नवी मुंबईत विशेष कामगिरी
नवी मुंबईत कार्यरत असताना बँक ऑफ बडोदा सानपाडा येथे भुयार खोदून चोरी केलेल्या गुन्ह्याचे छडा लावणे आव्हान होते, त्या आरोपींना मुद्देमालासह अटक केले,अल्पवयीन मुलीचा विनयभंग व बलात्कार करणारे असे एकूण २२ गुन्ह्यातील नराधमांना गुन्हेगारांना अटक केली. नवी मुंबईत विविध ६० जबरी गुन्हे केलेल्या आरोपींनी अडीच किलो सोन्याची चोरी केली होती.पाठलाग करत असताना खालापूर तालुक्यातील नाढळ येथे आरोपींना पकडताना सामोरा समोर गोळीबार केला होता या चकमकीत आरोपींना जेलबंद केले,कळंबोली सुधागड एज्युकेशन शाळेसमोरील गेटवर बॉम्ब ठेवल्याची बातमी समजली असता या प्रकारणातील आरोपी पकडून मोठा घातपात टळला या घटनेची दखल घेत पोलिस महासंचालकांनी टीमला ६ लाखाचे बक्षीस दिले.

- Advertisement -

कायद्याचा दबदबा राखला
कामोठे येथील सोन-चांदीच्या दुकानात २ किलो सोन्याची चोरी,तुर्भे येथील तिहेरी हत्याकांड,वाशी येथील सेक्टर १७ कुलूप तोडून सशस्त्र दरोड्यातील आरोपींना अटक करण्यासाठी शिरीष पवार यांची मोठी कामगिरी केल्याबद्दल सन -२०१९ साली पोलिस महासंचालकांच्या हस्ते सन्मानचिन्ह करण्यात आले. पोलिस खात्यात प्रदीर्घ सेवा करीत असताना जीवाची बाजी लावत सशस्त्र दरोड्यातील तसेच बलात्कार प्रकरणातील आरोपी पकडून कायद्याचा दबदबा राखला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -