घरपालघरपालिकेकडून ८३ कोटी ६६ लाख रुपये पाणीपट्टी वसूल

पालिकेकडून ८३ कोटी ६६ लाख रुपये पाणीपट्टी वसूल

Subscribe

सदर पथक थकबाकीदारकांची यादी तयार करुन प्रत्यक्ष थकबाकीधारकांना भेटी देणे, थकीत रक्कमेचा भरणा करण्याकरिता प्रवृत्त करण्याचे काम करत होते .

भाईंदर : २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षांत मीरा- भाईंदर महानगरपालिकेने ८३ कोटी ६६ लाख रुपये इतकी पाणीपट्टी वसूल केली आहे.तशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली . पाणी पुरवठा विभागामार्फत प्रती वर्षी पाणीपट्टी वसुलीकरीता विशेष मोहिम राबविण्यात येते. सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर अभियंता दीपक खांबित आणि कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांच्या नियंत्रणाखाली विशेष मोहिमेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, मेस्त्री, लिपिक व मिटर रिडर यांची नेमणूक करण्यात आलेली होती .

सदर पथक थकबाकीदारकांची यादी तयार करुन प्रत्यक्ष थकबाकीधारकांना भेटी देणे, थकीत रक्कमेचा भरणा करण्याकरिता प्रवृत्त करण्याचे काम करत होते . जानेवारी महिन्यापासून थकबाकीधारकांना पाणीपट्टी वसुल करण्याकरीता प्रथम नोटीस बजावण्यात आल्या व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसुली केली गेली. ज्यांनी नोटिसा देऊन सुद्धा पाणीपट्टी भरली नाही त्यांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम पालिकेने चालवली. या शिवाय नागरिकांमध्ये पाणीपट्टी भरणा जलद होणेसाठी जनजागृती करण्याकरिता ऑटोरिक्षावर ध्वनिक्षेपकाव्दारे जाहिर सूचना देण्यात येत होत्या .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -