महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उद्यापासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने प्रथेनुसार अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतरही आठवडाभर खातेवाटप रखडले होते. कोणाला कोणती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी सायंकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले.
खातेवाटपाबाबत शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपने मलईदार खाती आपल्याकडे ठेवून इतर खाती शिंदे गटातील मंत्र्यांना दिल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी सरकार गंभीर नाही, शेतकऱ्यांना कोणातीही मदत दिली नाही. विश्वासघाताच्या पायावर सरकार उभं आहे, असं म्हणत विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला.