सत्ताधारी पक्ष भाजप -शिवसेनेच्या विरोधात मविआने 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा घेतली होती. यावेळी मविआतील अनेक मोनेत्यांनी ठ्या भाषणं केली. या सभेनंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी मविआने घेतलेल्या सभेस्थळी जात, तिथे गोमूत्र शिंपडले. यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्वीट करत त्यांनी, जमलेल्या गर्दीवरही गोमूत्र शिंपडणार का? असा सवाल भाजपला केला आहे.(Chhatrapati Sambhajinagar BJP sprinkled cow urine at Mavia’s meeting place Jitendra Awhad angry and tweeted)
आव्हाडांचं ट्वीट काय?
2 एप्रिलला ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा झाली. त्याठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आले. त्यामागील उद्देश काय ते कळत नाही. हे सगळे सनातनी विचार आहेत. त्या सनातनी विचारांविरुद्ध आपल्याला लढायला हवे. प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा याच विचारांविरोधात होते. सभेच्या स्थानी असलेल्या सर्व नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.
काल ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा झाली त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं. त्यामागिल उद्देश काय हे कळतं नाही. हे सगळे सनातनी विचार आहेत. त्या सनातनी विचारांविरुद्ध आपल्याला लढायला हवं. प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा या विचारांविरुद्ध होते. सभेच्या स्थानी असलेल्या सर्व नेत्यांनी… pic.twitter.com/drKt2312vi
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2023
ह्या गर्दी वर पण #BJP गोमूत्र शिंपडणार का pic.twitter.com/j1uwYcEzCA
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2023
भाजपने हे कारण देत शिंपडलं गोमूत्र
1988 साली हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी येथून हिंदुत्वाची गर्जना दिली होती. या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर राहील, असे सांगितले होते. 2 एप्रिलला या ठिकाणी वज्रमूठ सभेच्या माध्यमातून हे मैदान अपवित्र झालं. त्यामुळे या मैदानावर गोमुख शिंपडल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र चरणांनी हे मैदान पवित्र झाले आहे. शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवण होती की राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पुर्णपणे गाडली पाहिजे. मात्र, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत सभा घेत असतील तर हे मैदान अपवित्र झाले आहे, असे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: “तुमच्यात धमक आणि ताकद असेल, तर….”, अजित पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज )
बाळासाहेबांनी 24 वर्षे लढा दिला
बाळासाहेब ठाकरे यांनी 24 वर्षे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढा दिला. हिंदुत्वाचा प्रवास थांबवणाऱ्या लोकांसोबत काल येथे सभा झाली. त्यामुळे हे ग्राऊंड गोमुत्र शिंपडून पवित्र करत आहोत, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काॅंग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची सभा झाली. त्यामुळे हे मैदान अपवित्र झालं. त्यामळे ते मैदान आता शुद्ध करण्याची गरज आहे म्हणत गोमूत्र शिंपडण्यात आले.