घररायगडमहिलांकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याची गय नाही

महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याची गय नाही

Subscribe

आता शिंदे-फडणवीसांचे सरकार असल्याने मुली आणि महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याची गय केली जाणार नाही, असा इशारा भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी खोपोलीतील सभेत बोलताना दिला. महिला सुरक्षा हाच या सरकारचा अजेंडा असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी पारित केलेल्या योजना घरघरात पोहचविण्याचे अवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

खोपोली: महाविकास आघाडीच्या काळात महिलांवरील आत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.अन्यायाविरूध्द आम्ही आवाज उठविला असता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.आता शिंदे-फडणवीसांचे सरकार असल्याने मुली आणि महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याची गय केली जाणार नाही, असा इशारा भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी खोपोलीतील सभेत बोलताना दिला. महिला सुरक्षा हाच या सरकारचा अजेंडा असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी पारित केलेल्या योजना घरघरात पोहचविण्याचे अवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
येथील लोहाना समाज सभागृहात रायगड जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या या उत्तर रायगड जिल्हा महिला मेळाव्यास पक्षाचे जिल्हा ध्यक्ष प्रशांत ठाकूर,पनवेल महापालिकेचे माजी महापौर कविता चौतमल, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरात, खोपोली संपर्क प्रमुख सुनील घरात, विधानसभा संयोजक दिपक भेहरे, उरण माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी,ओसवाल, खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल,सेक्रेटरी सुनील नांदे, हेमंत नांदे,अविनाश कोळी,अजय इंगुलकर,उपाध्यक्ष दिलीप पवार,मिडीया प्रमुख राहुल जाधव,गोपाळ बावस्कर,विकास खरपुडे यांंच्यासह नऊ मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.यावेळी अनेक महिलांनी भाजप मध्ये प्रवेश केला तर गुणवंत तर सामजिक कार्यात यशस्वी महिलांचा ही सन्मान वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाध्यक्षा पाटील यांनी प्रास्ताविकातून महिलांचे सुरु असलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल खेडकर यांनी केले.
बॉक्स..
‘थोडं थांबा, गॅसचे भावही कमी होतील’
प्रत्येक महिला सक्रिय होऊन महिलांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांना भेटले पाहिजे. आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यत योजना पोहचविण्याचे काम महिलांनी करावे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या १०२ योजना आहेत. त्या जनतेपर्यंत पोचविण्यासाठी काम करा महिला आणि तरुणी ची काळजी करणारे आपल केंद्र आणि राज्य सरकार आहे महिला बचत गटासाठी प्रोडक्शनसह मार्केटिंग कशी करायचे यासाठी आगामी काळात बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे सांगत, ‘थोडं थांबा , गॅसचे भावही कमी होतील’, असा शब्द ा भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावेळी महिलांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -