भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड या सामन्यासाठी पाच प्रमुख गोलंदाजांना संघात स्थान दिले. परंतु, ढगाळ वातावरणाचा इंग्लिश गोलंदाजांना फायदा करून घेता आला नाही. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी सुरुवातीपासूनच उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडला विकेट घेण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. राहुलने संयमाने फलंदाजी केली, तर रोहित आक्रमक शैलीत खेळताना दिसला. रोहितने ८३ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. तसेच २०१३ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचे इंग्लंडमधील हे पहिले कसोटी अर्धशतक ठरले.
८३ चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने अर्धशतक
Fifty up for Rohit Sharma!
Can he convert this into a hundred? 👀#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/1XNd8HWAOa
— ICC (@ICC) August 12, 2021
यंदा रोहितला पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळत आहे. या संधीचा त्याने पहिल्या दोन कसोटीत चांगला वापर केला आहे. तसेच त्याला राहुलची अप्रतिम साथ लाभली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३० षटकांनंतर भारताची बिनबाद ९१ अशी धावसंख्या होती. रोहित आणि राहुलच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळाले नाही.