घरक्रीडाउपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडसोबत!

उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडसोबत!

Subscribe

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला मागे टाकत ब गटात अव्वल स्थान पटकावले.

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांमधील साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला आणि दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला मागे टाकत ब गटात अव्वल स्थान पटकावले.

साखळी सामन्यांअंती ब गटात दक्षिण आफ्रिकेचे ७, तर इंग्लंडचे ६ गुण होते. अ गटात चारही साखळी सामने जिंकणारा भारतीय संघ अव्वल, तर यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ दुसर्‍या स्थानावर होता. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी आणि ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हे दोन्ही सामने ५ मार्चला (गुरुवार) सिडनी येथे होतील.

- Advertisement -

मागील (२०१८) महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट राखून विजय मिळवला होता. यंदा मात्र या पराभवाची परतफेड करण्याचे हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचे लक्ष्य असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -