अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने स्वतःवर झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणाला वाचा फोडली. तिने दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आरोप केला. तिच्या या धाडसाचे काहींनी कौतुक केले, तर काहींनी तिला खोटं देखील ठरवलं. मात्र या प्रकरणामुळे जगभरात राबवली जाणारी #MeToo कॅम्पेनची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. या माध्यमातून सोशल मीडियावर आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकारांची माहिती महिला देतात. जे तुमच्यासोबत झाले, ते माझ्यासोबत झाले होते. त्यामुळे मी टू असे या कॅम्पेनला म्हटलं जात आहे. या संकल्पनेला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अभिनेत्री सोहा अली खान हिने देखील या माध्यमाचे स्वागत केले आहे.
It’s wonderful that women are speaking out, it is very difficult for women to come out, takes a lot of courage. Women need to be fully supported for this: Soha Ali Khan on #MeToo campaign pic.twitter.com/zVLmXFIfy7
— ANI (@ANI) October 8, 2018
तर केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मनेका गांधी यांनी पुन्हा एकदा मी टू कॅम्पेन भारतात सुरू झाल्याबाबत आनंद व्यक्त करत आहेत.
Union Minister for Women and Child Development, Maneka Gandhi says she is happy that #MeToo movement has started in India
Read @ANI Story | https://t.co/kVj645KEJe pic.twitter.com/fwQAG4jLrT
— ANI Digital (@ani_digital) October 8, 2018
मी टू च्या कचाट्यात हे सेलिब्रिटी
मी टू च्या माध्यमातून नवनवीन खुलासे लोकांच्या समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना रनौतने क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरही छेडछाडीचा आरोप लावला असून गायक कैलाश खैर यांच्यावरही महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याशिवाय काहींनी आपल्यावरील आरोपाबाबत जाहीर माफी मागितली आहे. अभिनेता – दिग्दर्शक रजत कपूर यांनी आपल्या ट्वीटर अकांउटवरून एका महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. तर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला असून विकास बहलवरील आरोपावर त्यांचे फँटम फिल्म्सचे दुसरे पार्टनर विक्रमादित्य मोटवाने यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या चित्रपटांच्या सेटवर महिलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हमीदेखील त्यांनी दिली आहे.
I am sorry from the bottom of my heart- and sad that I was the cause of this hurt
to another human being.If there is one thing more important to me than even my work,
it is to be a good human being.
And I have tried to be that person.
And now, I will try harder.— Rajat Kapoor (@mrrajatkapoor) October 7, 2018