- Advertisement -
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी गौतम अदानी यांच्या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. पुनर्विकासासाठी ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’ने (डीआरपी) मागविलेल्या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या. प्रकल्पासाठी सहभागी झालेल्या तीन कंपन्यांपैकी अदानी समूहाने 5,069 कोटी रुपयांची बोली लावली.
- Advertisement -