घरव्हिडिओअजित पवार राज्य सरकारच्या साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावर संतापले

अजित पवार राज्य सरकारच्या साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावर संतापले

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेप निषेधार्ह असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. वास्तविक यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून साहित्य, संस्कृती व कला या सगळ्याला एक मानसन्मान मिळाला त्याचा एक आदर ठेवला गेला आणि तीच परंपरा असंख्य मान्यवरांनी पुढे चालवली आहे आणि त्याचप्रकारची घडी बसली असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून नवीन वाद काढायचे आणि नवीन समस्या निर्माण करायच्या व बेरोजगारी व महागाई या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच काम राज्यसरकारचे सुरू असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला

- Advertisement -