- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विदर्भाच्या समस्यांवर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी विरोधी पक्षातील आमदारांनी विधान परिषदेत भाष्य केले असून सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारवर टोलेबाजी केली. त्यावर सत्ताधारी पक्षातील भाजपाचे नेते श्रीकांत भारतीय यांनी प्रत्युत्तर दिले. शिवाय, गेल्या अडीच वर्षांत तुम्ही विदर्भावर एकतरी शब्द काढला का? असा सवाल श्रीकांत भारतीय यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केला.
- Advertisement -