- Advertisement -
शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित असलेली ३७ एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेत आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
- Advertisement -