- Advertisement -
शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंत घरांच्या मालमत्ता कर माफीची जी घोषणा केली आहे. यामध्ये एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या मागणीला समर्थन किंबहुना भूमिका आम्हीच घेतली. पण शिवसेनेचं मुंबईकरांवरचं आणि विशेषत: ५०० फुटांच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवरचं प्रेम हे बेगडी आहे. ते पुतणा मावशीचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांची प्राथमिकता काय आहे, ते स्पष्ट होते, असा टोला आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
- Advertisement -