- Advertisement -
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल दि. २९ जुलै रोजी जाहीर झाला. मुंबईतील सीएसटी स्थानकाजवळ असलेल्या फुटपाथवर राहणाऱ्या आसमा शेखने दहावीत ४० टक्के गुण मिळवले. त्यानंतर जेवढे कौतुक १०० पैकी १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे झाले. तेवढेच कौतुक आसमाचे होत आहे. आसमाच्या आईवडीलांना लेकीच्या या कामगिरीसमोर आभाळही ठेंगणे वाटू लागले आहे.
- Advertisement -