- Advertisement -
जगभरात कोरोनाने कहर केला असून देशात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देश व्यापून टाकला आहे. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोनाबाधित रूग्ण संख्येमुळे प्रशासन देखील चिंतेत आहे. परंतु, असं एक गाव आहे. ज्या गावाने कोरोनाला हरवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आणि त्या गावात सध्या एकही बाधित रूग्ण नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या गावातील गावकऱ्यांना मतदान करण्यासाठी ज्याप्रमाणे मतदान केंद्रावर घेऊन गेले जाते. त्याप्रमाणे गावातील नागरिकांना लस देण्यासाठी घेऊन गेले जाते. त्यामुळे हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
- Advertisement -