- Advertisement -
साखरीआगर येथे मासेमारी जेट्टी उभारण्यात येत आहे. परंतु येथील बांधकाम अर्धवट राहिले आहे. मच्छीमारांना नौकांवर सामान नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील जेट्टीचे काम पूर्ण करुन मच्छीमारांना दिलासा देण्यात यावा या मागणीवरुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली आहे. जेट्टीचा प्रश्न सोडवता येत नसेल तर काही हरकत नाही परंतु बैठका वारंवार घेणार असाल तर मला सभात्याग करावा लागेल असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
- Advertisement -