- Advertisement -
पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर कोरोना रुग्णांसाठी आयसीयूमध्ये बेडच शिल्लक नसल्याची माहिती देण्यात येत आहे. हे अतिशय धक्कादायक आहे. लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. मात्र, तरीही परिस्थिती अजून नियंत्रणात नाही. त्यामुळे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आता लक्ष घातले पाहिजे. त्यांनी रोज अर्धा दिवस पुण्यात थांबून परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
- Advertisement -