- Advertisement -
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाली असं स्पष्ट केलं. सध्या कोणत्याही युतीचा प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेण्यासाठी ही बैठक होती. राज ठाकरे यांची परप्रांतियांविषयीची भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्याशी युतीची चर्चा होऊ शकत नाही असं चंद्रकांत पाटील या भेटीनंतर म्हणाले.
- Advertisement -