- Advertisement -
दाट धुके, ढगाळ हवामान, पाऊस अशा कायम बदलणार्या हवामानाशी झुंज देत काजूचे पिक हंगाम उत्तम होताना दिसत आहे. पण, या पांढर्या सोन्याला योग्य दर मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दर मिळत नसल्याने काजू घरात पडून आहे. मात्र, शेतकरी संघटनेने निर्भिड भूमिका घेऊन काजूला योग्य हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी चंदगडच्या काजू उत्पादक शेतकर्यांकडून केली जात आहे.
- Advertisement -