- Advertisement -
अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) रद्द करण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला. त्याचवेळी अकरावीचे प्रवेश हे दहावीच्या गुणावंरच आधारीत करण्यात यावेत अशाही सूचना हायकोर्टाकडून देण्यात आल्या. राज्य सरकारचा सीईटी परीक्षेचा अध्यादेश रद्द करत हायकोर्टाने एक मोठा निर्णय शैक्षणिक वर्षाच्या तोडांवर दिला आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबर रोजी होणारी सीईटी परीक्षा आता होणार नाही. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे.
- Advertisement -