- Advertisement -
सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं सांगत महाराष्ट्राचा मराठा आरक्षण कायदा रद्द केला. यानंतर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. आज मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र राज्यपांलांना दिलं. राज्यपालांच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
- Advertisement -