- Advertisement -
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात वाद निर्माण झाला होता. खैरे यांनी सत्तार हे गद्दार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तार – खैरे यांची भेट घेऊन दोघांमधील वाद मिटवला. यापुढे औरंगाबादमध्ये एकदिलाने सर्व काम करतील अशी प्रतिक्रिया नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
- Advertisement -