- Advertisement -
कोरोनाबाधितांच्या ढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने काही नियमाची अंमलबजावणी केली आहे. मात्र, काही ठिकाणी हे नियम पायदळी तुडवल्याच्या घटना समोर येत आहेत. सोलापूरमध्ये अंत्यविधी दरम्यान हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यातील ४५ जणांना पोलिसांनी अटक केली असून २०० हून अधिक रुग्णांवर गुन्हा दाखल केला आहे. तर अंत्यविधीला गर्दी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे.
- Advertisement -