- Advertisement -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या घटनेवरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्त्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे राजकारण रंगल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर खापर फोडताच फडणवीसांनी पलटवार केला आहे. दोन जिल्ह्यात एकाचवेळी औरंगजेब, टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाही. याची खोलवर चौकशी केली पाहिजे असा इशारा फडणवीसांनी दिला.
- Advertisement -