- Advertisement -
विदर्भातील प्रश्न सुटावेत याकरिता राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याची प्रथा आहे. मात्र, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भवासीयांनी सत्ताधाऱ्यांचं एवढं जंगी स्वागत करूनही सत्ताधाऱ्यांनी विदर्भासाठी काय केलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नुकताच पत्रकार परिषदेत उपस्थित केला. त्यांची पत्रकार परिषद संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी नवं घोषवाक्यच सभागृहात जाहीर करून टाकलं. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत. असं म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत कालबद्ध कार्यक्रम आखून विदर्भाचा विकास करूया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं.
- Advertisement -