- Advertisement -
सांगली आणि मिरज शहरात असणाऱ्या तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. आज या तलावात माश्यांचा खच ठिकाठिकाणी निर्माण झाला आहे. तर दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हजारो मासे मृत्युमुखी पडल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र हे मासे नेमके कोणत्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले हे स्पष्ट होऊ शकले नाही. पालिका प्रशासनाकडून मृत मासे बाहेर काढण्याचा काम सुरू करण्यात आले आहे.
- Advertisement -