- Advertisement -
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातून पुढे आला. जात पंचायतीच्या न्यायनिवाड्यातून हा अन्यायकारक प्रकार झाला असल्याचा दावा जात पंचायत मूठमाती समितीनं केलाय. वेगवेगळ्या जातींमध्ये तथाकथीत पंच अशा अमानुष शिक्षा रोजच देत असतात. जात पंचायतींची निर्मिती कशी झाली आणि आजची परिस्थिती काय आहे याचं विश्लेषण करताय आपलं महानगरचे नाशिक ब्युरो चीफ हेमंत भोसले.
- Advertisement -