- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त (१२ डिसेंबर) कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. पवारांनी कृषी खातं १० वर्ष सांभाळून अन्नधान्याच्या बाबतीत भारताला स्वयंपपूर्ण केले. पवारांच्या या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न मिळावे, अशी कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट केली.
- Advertisement -