- Advertisement -
१०३ वर्षांपूर्वी एक धक्कादायक हत्याकांड घडले. ज्याचे पडसाद संपूर्ण पंजाबसह देशभरात उमटले. या हत्याकांडाला भारत आजही विसरलेला नाहीये. या घटनेत शांततापूर्ण विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या या एका घटनेने देशाच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली आणि या घटनेने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला गेला, असे इतिहासकार सांगतात.
- Advertisement -