- Advertisement -
ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. एका खटल्यात ठाणे पोलिसांनी आपणांवर चक्क 24 गुन्हे दाखल असल्याचे नमूद करणारे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे डॉ. आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.
- Advertisement -