- Advertisement -
२०२० या वर्षाची भयानक आठवण कोणती असा जर कोणाला प्रश्न विचारला तर सर्वांची एकच आठवण असू शकते ती म्हणजे कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन. लॉकडाऊनमध्ये देशातील कष्टकरी, गोरगरिबांची फरफट झाली. त्यामुळे आता लॉकडाऊनचे नाव जरी काढले तरी सर्वांना घाम फुटतो. भारतात २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला. यानंतर जे काही चित्र देशाने पाहिले ते कधीही न विसरण्यासारखे आहे. लॉकडाऊनमुळे कोट्यवधी कष्टकरी, स्थलांतरित मजुरांचे हाल झाले.
- Advertisement -