- Advertisement -
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या अग्र्याहून सुटकेची तुलना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वक्तव्यावरुन वाद सुरु असताना लोढा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. लोढांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीने चांगलाच समाचार घेतला आहे. तर शिंदे फडणवीस सरकारमधील काही नेत्यांनी लोढांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
- Advertisement -