- Advertisement -
ठाणे, मुंबई परिसरातील सर्व गरीब, मजुर लॉकडॉऊन काळातील रोज नवीन शासन आदेशामुळे भयभीत झाल्याने त्यांनी मुळगावी जाण्याची वाट धरली आहे. शासनाकडून किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेला कंटाळून मजुर ट्रक, टेम्पो, रिक्षा, दुचाकीवरून, हातगाडी, पायी प्रवास करत आहेत. त्यामुळे ठाणे नाशिकरोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.अशा वेळी पोलीस प्रशासन काय करतेय? जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली होत असताना संबंधित प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका जाणीवपूर्वक घेताहेत का? की या अवैध मानवी वाहतुकीला राज्य सरकारचा छुपा पाठिंबा आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गंभीर बाबीची दखल घेणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत..
- Advertisement -