- Advertisement -
मागील अकरा वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. असताना ह्याच महामार्गावर मागील ११ वर्षात सुमारे साडेतीन हजार अपघात होऊन अनेकांचा बळी गेलेला आहे. यास जबाबदार व्यवस्थेचा निषेध नोंदवून अपघातात मृत्यू पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि खड्डेमुक्त महामार्ग व इतर मागणीसाठी मंगळवार दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथे मानवी श्रद्धांजली साखळीचे आयोजन करण्यात आले.
- Advertisement -