- Advertisement -
मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगूनही लॉक डाऊन काळात काही लोक घराबाहेर पडून स्वत: बरोबर इतरांचा जीव धोक्यात आणत आहेत. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख काल स्वत: पोलिसांसोबत मालाड, मालवणी येथे फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले. नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. शेख म्हणाले की, ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच सरकारने लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -