- Advertisement -
रमजानच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून ज्यादाचे पोलीस फोर्स मुंबईभर तैनात केल्या आहेत. लॉकडाऊन काळात जमावबंदी आणि संचारबंदी असल्यामुळे कोणीही यांचे उल्लंघन करू नये म्हणून विशेष काळजी घेतली जातेय. त्याचबरोबर मुस्लिम समुदायातील काही लोकांशी पोलिसांकडून संवाद साधण्यात येत असून लॉकडाऊनचे नियम कोणीही तोडणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम समुदायाने सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केलंय.
- Advertisement -