- Advertisement -
फडणवीस सरकारच्या काळात राज्यात सर्वात मोठा 25 हजार कोटींचा घोटाळा महाआयटीच्या माध्यमातून झाल्याचा गौप्यस्फोट करणार्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याच सरकारला अडचणीत आणले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारित येणार्या माहिती तंत्रज्ञान खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा जावईशोध लावत राऊत यांनी मातोश्रीपुढील संकटे वाढवली. कारण मागील अडीच वर्षे मातोश्रीच्या जवळील आणि ठाकरे कुटुंबीयांची नातेवाईक असलेली व्यक्ती माहिती तंत्रज्ञान खाते कंट्रोल करीत असल्याची धक्कादायक माहिती आपलं महानगरच्या हाती लागली आहे. माहिती तंत्रज्ञान खात्यात कमालीचा इंटरेस्ट असलेल्या शिवसेनेच्या एका खासदाराच्या पत्राचा हवाला देत राऊत यांनी 25 हजार कोटींचा मोठा आकडा पत्रकार परिषदेत फेकला आणि तेच आरोप राऊत यांच्यावर बुमरँग होण्याची चिन्हे आहेत.
- Advertisement -