- Advertisement -
कोकणात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेतले जाते. तसेच राज्य सरकारने धान खरेदी सुरू केली असून, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे. यावर्षीचा बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही, यामुळे हा बोनस द्या, अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा सभागृहात केली. तर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा हीच मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना शेतकऱ्यांच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी, यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रतिएकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगतानाच धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
- Advertisement -