- Advertisement -
महाविकास आघाडीमधील मंत्री म्हणतात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताचे सरसकट पंचनामे करा परंतु ते होत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतात मात्र मदत अजूनही करण्यात आली नाही. यामुळे मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात पण मदत करत नाहीत असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असल्यामुळे त्यांना तात्काळ २५ हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच गुरुवारी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले आहे
- Advertisement -