- Advertisement -
तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. यामध्ये अनेक बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आधीच कोरोनामुळे कंबरडे मोडलेले असताना पुन्हा एकदा या चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन नुकसान झालेल्या कोकणवासियांना आर्थिक मदत करावी आणि त्यांना पुन्हा एकदा उभारी द्यावी, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
- Advertisement -