- Advertisement -
ईडीनं राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर सुरू केलेल्या कारवाईबाबत आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही महाराष्ट्राचा देशासाठी आधार म्हणून उपयोग का करत नाही? महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय. धाडीमागू धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका”, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.
- Advertisement -