घरव्हिडिओ'सरकार मराठा समाजासोबत द्वेषाने वागतय'

‘सरकार मराठा समाजासोबत द्वेषाने वागतय’

Related Story

- Advertisement -

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. ५ मे रोजी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले मात्र, आजतागायत सरकारने कोणत्याच हालचाली केल्या नाही. सरकार मराठा समाजाविरोधात द्वेषाने वागत असल्याची टीका देखील यावेळी मेटे यांनी केली. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात येत्या मंगळवारी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. याबरोबरच मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांना ताबडतोब नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी देखील मेटेंनी केली आहे. अन्यथा न्यायालयात सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा यावेळी मेटेंनी दिला आहे.

- Advertisement -