नितळ आणि मुलायम त्वाचा ही प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. याकरता अनेक महिला महागड्या क्रीमचा, फेसपॅक, फेसवॉश यांचा देखील वापर करतात. मात्र, याचा काही दिवसांनी चेहऱ्यावर परिणाम देखील होतो. त्यामुळे फक्त पाण्याचा वापर करुन तुमची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया पाण्याचा कसा वापर करावा.
चेहरा तजेलदार होतो
कोरड्या त्वचेवर सुरकुत्या लवकर पडू शकतात. म्हणून गार पाण्यानेच तोंड धुवा. यामुळे चेहरा तजेलदार होतो. कारण गार पाण्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि चेहरा तजेलदार होतो.
चेहऱ्यावरील घाण निघून जाते
थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर साठून राहिलेली घाण निघून आणि चेहरा देखील फ्रेश राहतो.
चेहरा काळवंडल्यास
उन्हातून आल्यानंतर चेहरा काळवंडलेला दिसतो. बऱ्याचदा बाहेर असताना सूर्यकिरणे त्वचेवर पडतात आणि त्यामुळे चेहरा काळा पडतो, अशावेळी चेहरा गार पाण्याने चेहरा धुवावा.
चेहरा टवटवीत होतो
गार पाणी चेहऱ्याच्या त्वचेवर टोनिंग करते. त्यामुळे चेहरा टवटवीत राहण्यास मदत होते.
चेहरा स्वच्छ होतो
सातत्याने चेहरा गार पाण्याने धुतल्यास चेहरा स्वच्छ होतो.
हेही वाचा – अशी स्वच्छ करा स्वयंपाक घरातील भांडी