अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होण्यास मदत होते.
- पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.
- सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येतील.
- रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचे कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्शात घालावा.
- कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, यामुळे चविष्ट होते.
- भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. यामुळे दुर्गंधी दूर होते.
- हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
- पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध आणि बेसन मिसळा. यामुळे पुर्या खुसखुशीत बनतील.
- मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा.
- डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा.