इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत आहे. आता भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे आणि त्या पाठोपाठ पी.व्ही. सिंधूदेखील उपांत्यपूर्व फेरीत दाखल गेली आहे. त्यामुळे आता सायना आणि सिंधू यांचे पदक नक्की झाले आहे. सध्या पदक तालिकेत भारत २९ पदकांसह आठव्या स्थानावर आहे.
सायना आणि सिंधूने रचला इतिहास
महिला बँडमिटनच्या उपान्त्यपूर्व फेरीत दोन भारतीय महिला खेळाडू असण्याची ही पहिलीच वेळ आहे. सायना पाठोपाठ पी. व्ही. सिंधूने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करुन इतिहास रचला आहे. आता कोणत्या पदकावर या दोघी मोहर उठवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
.@NSaina in Semis!
Our #Badminton star and #TOPSAthlete put in a quality display to beat #RatchanokIntanon of #Thailand in straight sets and reach the women’s singles semi-final for the first time. #GoForGold #SAI @BAI_Media #IndiaAtAsianGames #AsianGames2018 #KheloIndia? pic.twitter.com/hmLw5jxgiU
— SAIMedia (@Media_SAI) August 26, 2018
भारतीय खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवरील एका व्हिडिओतून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देत तुमचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. ते सध्या जकार्तामध्ये असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर केला आहे.
Honb’l Sports Minister @Ra_THORe‘s message for the Indian contingent, “We all are very proud of you, keep the ??flying again and again.” @Media_SAI @IndiaSports @ioaindia #PunchMeinHaiDum #AsianGames2018 #IndiaAtAsianGames2018??? pic.twitter.com/LRfjwSa3Bw
— Boxing Federation (@BFI_official) August 26, 2018